Thursday, October 27, 2011

१० सुत्री मोहिम अंतर्गत महाविद्यालय/शाळा मधील विद्यार्थी यांना विविध प्रकारचे प्रमाणपत्र महा ई सेवाकेंद्रातुन मिळणार

शेतकरी, शेतमजूर, महिला आणि सामान्य नागरिक यांना विविध प्रश्नांच्या संदर्भात तलाठी कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालय येथे वारंवार जावे लागते. पण त्याचबरोबर दरवर्षी जून- जुलै महिन्यात दहावी व बारावी झाल्यानंतर शाळा, कॉलेज प्रवेशाच्या वेळेस विविध दाखल्यांसाठी तहसिलदार कार्यालयात विद्यार्थ्यांची व नागरिकांची प्रचंड गर्दी होत असते. शासनाच्या नव नवीन योजना, नियम व अटीमुळे नोकरीसाठी वेगवेगळया दाखल्यांची गरज भासते. यासाठी बदलत्या काळातील आव्हानावर मात करण्यासाठी उपलब्ध साधन सामुग्री व आधुनिक तंत्रज्ञानाचा सुनियोजित वापर तसेच जनतेच्या गरजा व निकड लक्षात घेऊन राज्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियान राज्यातील सर्व जिल्ह्यात दिनांक १ मे २०११ पासून राबविण्यात येत आहे. 

No comments: